श्री निरंजन रघुनाथ चरित्र
जन्म – कळंब, परळी वैजनाथजवळ, मराठवाडा
शके 1707, कार्तिक (शु/8 इ.स.1782)
पूर्वाश्रमीचे नाव - अवधूत
घरच्या गरीबीमुळे मूळ गावाहून तरूणपणी पुण्यास नष्टे नांवाच्या हुंडेकऱ्याकडे नोकरी – कारकून. सेवाधर्माचा कटू अनुभव आणि स्वार्थपरायण कुटुंबीयांमुळे वैराग्य उत्पन्न झाले. इ.स. 1811 चा हा काळ होता. पेशवाईची का....................... आली होती. (1818 पासून इंग्रजी राजवट)
पुण्यास बेलबागेमध्ये त्यावेळी ठाकूरदास नांवाचे प्रख्यात हरीदास करीत असत. त्यांचे कीर्तन ऐकून ............... वैराग्य उत्पन्न झाले आणि त्यांनी पुणे सोडले व भ्रमणास सुरूवात केली. आळंदी – देहू येथे इंद्रायणीचे पाणी हातांत घेऊन "आजपासून एक वर्ष सात दिवसांत सगुण साक्षात्कार झाला नाहीतर प्राणत्याग करीन." अशी तुकोबांची साक्ष ठेऊन घोर प्रतिक्षा केली. तेथून घोडेगांव, जुन्नर, कोतूळ अशी गावे घेत ते नगर जिल्ह्यातील अकोले येथे आले. तेथे कांही दिव राहून नाशकास गेले. तेथे त्यांची रघुनाथ नावाच्या सत्पुरूषाची गांठ पडली व त्यांना इ. स. 1811 गुरूंनी अपरोक्ष साक्षात्कार करून दिला. तेथे त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांना जरी निर्गुण आत्मसाक्षात्कार झाला तरी सगुण दर्शनाची प्रतिज्ञा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांवी गुरूंचा आज्ञा घेऊन गिरनार येथे दत्त भेटीसाठी जाण्याचे ठरविले. कोकण – गुजराथ – सुरत असा पायी प्रवास करीत ते गिरनार पर्वतापर्यंत आले. परंतु प्रतिज्ञापूर्ती दिवासास अवकाश असल्याने त्यांनी तीर्थयात्रा करून नंतर गिरनार प्रदक्षिणा सुरू केल्या. शेवटच्या तीन .................. दत्तात्रयांनी ब्राम्हण
रूपाने येऊन पहिले दिवशी स्वप्नात वस्त्रे दिली. सकाळी खरोखरीच त्यांना वस्त्रे मिळाली. तिसरे दिवशी खडावा प्रत्यक्षात मिळाल्या परंतु साक्षात दर्शन नाही म्हणून रात्रंदिवस त्यांनी आकांत मांडला. तीन दिवस झाल्यावर चवथे दिवशी श्री गुरूंचे नांव घेऊन एका शीळेवर डोके आपटून प्राण देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे केले असता डोके फुटून गेले. त्याबरोबर आपल्या तोंडात कोणीतरी कमडंलूतले पाणी घालीत आहे असा भास झाला ते सावधान होऊन पहातात तो प्रत्यक्षात श्री दत्तात्रय सगुणरूपाने उभे आहेत असे दिसले. श्रीं नी त्यांच्य डोक्यावरून हात फिरवला. मस्तकावर झालेली मोठी जखम आपोआप भरून गेली. श्री रघुनाथ गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाचे मनन करण्यास सांगून श्रींनी निरोप दिला.
या सगुण दर्शनाची चालती बोलती खूण म्हणून केशापासून भिवयापर्यंत एक वण अखेरपर्यंत मस्तकावर राहिला होता. गिरनारहून निरंजन स्वामी गुरू दर्शनास परत नाशकास आले. तेथे काली दिवस गुरू सेवा करून आपल्या कळंब या मूळ गांवी गेले. तेथे कांही वर्षे रालून गुरूबंधू श्रामंत वासुदेव पंडीत भाऊ महाराज यांचेकडे कोल्हापुरास सहकुटुंब राहिले. तेथून श्री गंगाधररांव पटवर्धन यांचे बोलावण्यावरून इ. स. 1845 सुमारास मिरजेस राहण्यास आले. मिरज सरकारांनी त्यांचेकडून अनुग्रह घेतला. पण मठ जमीन वगैरे कांही करून घेतले नाही. त्यांची विरक्त वृत्ती पाहून सरकारांनी त्यांचे चिरंजीव योगिराज यांना मठ व इनाम जमिनीची सनद करून दिली. 1866 साली सन्यांस ग्रहण केला व त्याच साली भाद्रपद शु/11 स त्यांनी मिरजेस कृष्णा प्रवहात जलसमाधी घेतली.
v निरंजन रघुनाथ यांचे ग्रंथ -
1) ज्ञानेश्वरांवर टीका
2) अमृतानुभव टीका
3) साक्षात्कार व आत्मप्रचिती हो दोन प्रकरणे आत्मबोध
4) शांकर भाष्यावर टीका
5) मांडुक्य उप. टीका.
v आत्मप्रचीतीमधील काही ओव्या –
ठाकूरदास -
अनेक प्रकारचें मतांतर। सांगूनि भेदितसें अंतर।।16।।
म्हणे तुम्हीच रे ईश्वर। नरदेही अवतरला।।
तुम्हीं तीन्ही अवस्था जाणतां। जाग्रति सुषाही व्दथा।।
या तिहींचा जो पहाता। तेचिं तुमचे स्वरूप।।17।।
ऐंसे ऐकून कीर्तन। माझें दचकले अंतःकरण।।
नेत्री पातले जीवन। कंठ दाटूनि तो आला।।26।।
पाठीं उभे राहिले ते काटे। शरीर कांपे थरथराटे।।
बोलूं जातो कंठ दाटे। शब्द ओठीं न निघती।।27।।
वांटे आतांचि येईल मरण। म्यां कांही न केले साधन।।
व्यर्थ गमाविले जिणे। विषयभदें करूनि।।28।।
तैसा मी भयभीत झालो। ठाकोरदासा जवळीं गेलो।।
हात जोडोनि विनंम्र झालो। स्तुती वदलों विशेष।।33।।
धन्यधन्य तुमचे कीर्तन। ऐकोनि झाले समाधान।।
आतां उव्दिग्न झाले मन। सर्व त्यागुनी जातसे।।34।।
साधू वदला प्रसन्न वदन। तूं होशील रे नारायण।
मला तोच शकुन मानून। तेथोनिया निघालो।।36।।
सकाळी पुण्याच्या बाहेर पडून चिंचवडाकडे निघालो मार्गांत एक जटामंडीत तपस्वी दिसला त्याला जवळचा तांब्या दान केला. चिंचवडास एक बैरागो दिसला त्यास उपरणें देऊन टाकले. देहूस तुकाराम – पांडुरंगाचे दर्शन घेतले.
अस्तू तया स्थळी जाऊन। उदासीन झाले मन।
वाटे मी नरतनूस येऊन। कांहीं सार्थक न केले।।47।।
ऐसा होऊन उदासीन। वस्त्रे वाटिली साधू लागून।
एक घोळ पांघरून। रात्रौ जागर पै केला।।48।।
क्षणक्षणा अश्रू येतीं नयनी। बहुसंताप उठे मनी।
वाटे म्यां जन्मास येऊनि। कांहींच केले नाहीं मी।।49।।
ऐसा आहोरात्र खेद करितां। भानू उदय झाला अवचिता।
मग स्नानासि घाटावरूता। इंद्रायणीच्या पातलों।।50।।
पूर्वदिशा आवलोकून। केले तुकारामाचे स्तवन।
समर्था। तूं धन्यधन्य। मजवर कृपा करा का।।51।।
एसे करितां स्तवन। तों दृष्टी पडली कौपीन।
दुसरे कटिसूता लागून। देखतां झालों ते ठाया।।52।।
तोचे प्रसाद वस्त्र घेऊन। तेथे कौपीन केली धारण।
सर्वांशी भस्म लाऊन। केले ध्यान दत्ताचें।।53।।
मग करं संपुटी जळ घेऊन। सोडले संकल्पा लागून।
जीवभाव मनःप्राण। गुरू अर्पण केलासे।।54।।
हृदयीं ठेवला नेत्र करून। आजपासून व्दादशमहिने।
दुपरी सात दिवस जाण। देह धारण करणें हा।।55।।
मजला दत्तात्रय दर्शन। झालिया ठेवीन हा प्राण।
नाहींतरी देह अर्पण। केला असें गुरूपायीं ।।56।।
ऐसा करूनि निश्चय अंतरी। साक्षी तुकोबा बाहेरी।
वाचे करूनि दीर्घस्वरें। तेथें वदतो जाहलों ।।57।।
...
अखंड वाचेसी नामस्मरण। दत्त अवधूत हेचिं भजन।
त्रैलोक्यी जयाचे गमन। जग उध्दारा अवतरले ।।61।।
करूनि त्यांचे नामस्मरण। पाऊल ठेवा भूमीलागून।
ऐसें अखंड लागले ध्यान। वेधलें मन निजरूपीं ।।62।।
अशा तऱ्हेनें हिडंत असतां मार्गातील लोक हासावयाचे – वेडारे वेडा म्हणायचे – पश्चातापाने दग्ध झाल्याने क्षुधेचे भानच राहिलें नाहीं. तहान लागल्यास पोटभर पाणी प्यायचे। अशा तऱ्हेंने तीन दिवस चाललों कोणतेच भान नव्हते. चौथे दिवशी सकाळी घोडेगांव लागले. तेथेंही वेडा आलारे असेंच लोक म्हणू लागले. या गांवात भिकोबा बाबा नांवाचा संत होता. त्याचेजवळ तीन दिवस राहिलों. गांवात भिक्षा मागितली. अंगावरील वस्त्र फाटून चिंध्या झाल्या होत्या. तेथून ब्राम्हणवाडा या गांवी गेलो. तेथें एका कानफाट्या बैराग्याजवळ राहिलो. त्यानें सांगितले कीं तुझा निश्चय पक्का असेल तर गिरनार पर्वतावर दत्तात्रय तुला दर्शन देतील. तेथें अनेक योगी अनुष्ठान करीत असतात. हे ऐकून गिरनार पर्वतावर जाण्याचे ठरविले. तेथून जुळारास गेलो. लोकांनी अनेक तऱ्हेने टवाळी केली. पण त्याच गांवी कुशाबा नांवाचा संत भेटला.
।।त्याचि गांवी कुशाबा संत। कौपीन धारी पिशाचवत् ।।
वेडियासारखा असे फिरत। शुध्द नाहीं देहाची।।93।।
मुद्रा लाऊनि खेचरी। अलक्ष पाहे दिगंतरी।
श्वासोश्वास वाहती अंतरी। सुषुश्रा मार्गि चालतू।।94।।
ऐसी तयाचि धारणा। दृष्टी देखिला योगिराज।
तथांसि केले साष्टांग नमना। हात जोडूनि विनविलें।।95।।
लोक त्याला वेडा समजत होते, पण त्यानें मला उपदेश केला. कंथा जतन कर म्हणून सांगितले. माझ्या वृत्तीस आनंद वाटला. त्यांची आज्ञा घेऊन मी पुढे निघालों. पुढें कोतुळ गांवी चंडीदास बाबा नांवाचे संत भटले. त्यांनी दिगंबर अवस्था का? म्हणून विचारें तेंव्हा कंथा अनंत ठिगळ्यांनी भरलि असल्याने नेसलो नाहीं असे सांगितले. त्यांनी भोजनास दिले व दत्तात्रय पुराणश्रावणास बसावयास सांगितलें. त्यांचे घरी तीन दिवस राहिलों. एक दिवस त्यांचे माडीवर मानसपूडा आरंभली.
।।आसनी बैसलो असता जाण। नाहीं भान देहाचे।
।हृदयांतरी करितों ध्यान। हें देही गेंलो विसरून।
।तेथिचा आनंद पाहून। वृत्ति शून्य पै झाली।।
त्या गांवी एका तरूण मुलींने मला पाहिलें. तिचा नवरा बऱ्याच वर्षापासून नाहींसा झाला होता. मीच तो असावा असे समजून तिने घरीं सांगितले. तिची आई व अनेक सोयरे जमा झाले. त्यांनी माझा वृत्तांत विचारला. मी माझे नांव गांव सांगितले आणि मीं तुमचा जावई नव्हे असे परोपरीने सांगितले आणि या कटकटतून वाचलो. मला माझ्या घराची व संसाराची आठवण झाली. लहानपणींच कष्ट करून कुटुंब पोसत होतो. पैसा संपला की घरची मंडळी पुन्ला देशांतराला जाऊन पैसे मिळवून आण म्हणत. असे कित्येक वर्षे चालले. एक वेळी स्त्री तरूण झाल्याचे समल्यावर घरी बरेचसे द्रव्य घेऊन गेलो. आनंद भोगला, सहा महिने झाले घरची मंडळी केंव्हा जाणार म्हणून विचारू लागली आणि एक दिवस द्रव्य मिळविण्यासाठी घर सोडावे लागले. पुण्यास कीर्तन प्रसंगी वैराग्य आले व सर्वसंग परित्याग करून ................... दत्त भजन करीत भटकू लागलो. ही सर्व कथा चंडीदासबाब व मुलीच्या लोकांना सांगितली. त्यांनी ती पटली. नंतर तेथून ................. गेलो. दिगंबरच होतो. त्या रात्री ब्राम्हण रूपानें दत्तात्रय आले व अंगावर वस्त्र वापरत जा म्हणून त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी एका ब्राम्हणानें दिलेले वस्त्र घेतले. तेथून नाशिकला आलो. तेथील देवतांची दर्शनें घेतली. पंचवटीस रामदर्शन घेतले. एके रात्री दत्तात्रयांनी स्वप्नांत रघुनाथ भटजीकडे जा म्हणून सांगितले. सकाळी एका संन्यासाला त्यांची माहिती विचारली. त्यांनी सायंकाळी भटजी भेटतात म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले माझे अंतःकरण शुध्द असेल तर आज सकाळींच मला त्यांचे दर्शन झाले पाहिजे असे म्हणून मी घाटावर चढलों तो कांही अंतरावर ब्राम्हण मंडळींचा समुदाय दिसला. त्यांत रघुनाथ गुरूंचे दर्शन झाले. आनंद झाला.
तंव गुरूराय तेथोनि गेला। जै दरिद्रिया परीस सांपडला।।
तेथील इतर ........ चे मार्फत रघुनाथ गुरूंचेकडे गेलो. त्यांनी विचारपूस केली. भोजनास थांबण्यास सांगितले. माझी सर्व हकीगत सांगून गिरनारास सगुण दत्तदर्शनासाठी जात आहे असे सांगितले. त्यांनी हसून येथेंही दत्त आहेतच असे सांगितले व त्यांच्या दत्तमंदिरातील मूर्ती दाखविली. ते पाहून अतिहर्ष झाला. मला चार दिवस राहण्यास त्यांनी सांगितले. त्या रात्रीं मला ब्राम्हण रूपाने देवान रात्री दर्शन दिले व सांगितले की येथे सोळा दिवस रहा. सकाळी सर्व कर्मे आटोपून माधुकरी मागून भक्षण केली. सायंकाळी गुरू मंदिरात गेलो. इतर मंडळी गेल्यावर त्यांनी कोणता सांप्रदाय? असे विचारले.
।।.................... तुझा ............ ध्यान। त्यांना निराकार कीं सगुण।।
............ धारणा धरूनि मनी। उदासीन पै केले।।
त्यांना नम्रतेनें सांगितलें.
।।ऐके वो सदगुरू समर्थ। माझी पश्चातापी कथा।।
।अग्निज्वाला नखादि शिखा। व्यापुनिया राहिल्या।
म्हणून भ्रमिष्टाकृती होऊन। फिरत आलों देशाटन।
परि स्थिर नव्हे अंतःकरण। उदासीन सर्वथा।।
।गुरूकृपा नाही संपादिली। धारणा अद्यापि नाहीं धरली।
संत मुखे किर्तन ऐकली। ते सगुण मूर्ती ध्यातसे।
गुरू रघुनाथ म्हणाले, उत्तम झाले आतां पश्चाताप सोड आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक.
।टोकोनिया शब्द विभाग। सांडोनि पोकळी दिशावलंब।।
।त्यागोवि आधार प्रकाश। चिदाकाश ते घेईल।।
आकाश सर्व व्यापक आहे। बाह्य दृष्टीसी न दिसताहे।
जेणि हृदयांतरी पाहे। ज्ञानदृष्टी करूनियां।।44।।
मग मी तैसाच पाहूं गेलो। पाहता तदाकारचि झालो।
देह स्फूर्तिने विसरलो। कोठे कांही ............................।।45।।
............ ध्याता कवण ध्यान। कोण वक्ता श्रोता करून।।
पाहतां हारपुनी गेले मन। तीव्र ध्यान लागले।।46।।
शरिरामनी आभास भरले। वाटे मस्तक भेदुनी गेले।
ब्रम्ह कराहामाजी मिनलें। स्वरूप माझे सर्वली।।47।।
अशा प्रकारे चार घटका ध्यानांत होतो. सर्व देहभान विसरलो – वाचेला शब्द फुटेना. नंतर सदगुरू म्हणाले ध्यान विसर्जन कर –
।तन अंतरी काढू गेलो ध्यान। वाटे कोठे ठेऊं काढून।
।याजला ठेवितों ठिकाण। याविण नाहीं दुसरा।।49।।
।अंतरी एकचि झाला गोळ। वाटे हृदयि आले भूगोल।
खाली वरी मध्ये निर्मळ। मीच अवघा व्यापलों।।50।।
माझी ही अवस्था पाहून श्रीगुरू म्हणाले –
।हेंचि ब्रम्ह निराकार। निरंजन निराधार।
।निःप्रपंच निरव्यापार। हेंचि स्वरूप तुझें पै।।52।।
।तुझें स्वरूप निराकार। हेंचि स्वरूप तुझे पै।।
।तुज जन्ममृत्यूचा घोर। एथून आतां नसेचि।।54।।
।आतां निर्भय होय अंतरी। सांडी व्देताची कर्तरी।
।नांदे एकपणाचे घरीं। स्वानंदेसी सर्वदा।।55।।
या प्रमाणें गुरू कृपा झाली,
।म्हणे शुकभृगपासून। म्यां संपादिले आत्माज्ञान।
।आकाशवत् चिंतन करून। हृदयांतरी पहावे ।।68।।
दुसरे दिवशी गुरूंना स्वप्न सांगितले. त्यांना आनंद झाला. त्यांनी बीजसहित दत्तात्रय मंत्र दिला. त्यांना नमन करून निघालो. या दिवसांत उन्माद दशा आली.
।नेत्र भ्रुकुटी एकच झाली। मस्तकाप्रती कळ लागली।।
।आकाशमय वृत्ती जाहाली। भान नाहीं देहाचे।।
।वाटो आकाशीच उडावे। किं समुद्रापलीकडे जावे।
।कीं ब्रम्हांडाचि गिळावे। तोंड पसरून आवघे।।86।।
।स्फुरण चढे नीराप्रती। बाहु उडली तटतटा।।
।जैसा मद्यपि दिसे भ्रांत। तैसी गती जहाली।।
।आपुलें न दिसेचि शरीर। आवघें दिसे निर्विकार।।
।सृष्टी जाहली धुम्राकार। नाहीं आकार कोठेही।।92।।
आणि माझ्याकडे कृपादृष्टीने पाहून मला देह भानावर आणलें. त्यावेळी माझें शरीर शीतल झाले. झोप आली आणि त्यांतच गाड समाधि लागली. तिला तूर्या म्हणतात. अशा प्रकारे गुरूप्रसाद झाला. दरिद्र्याला राज्य मिळाले, जीव जीवनमुक्त झाला. असे तीन दिवस झाले. मध्यान्ह रात्री –
करीत बसलो होतो ध्यान। तों एक वेश्याजवळ येऊन।
तिने आपुल्या स्तने करून। माझे दृष्टी ताडले।
आणखी एकाच हाशिने। आठ वेश्या गृह बांधून।
आपुल्या दारी बैसून। मज बोलावूं लागल्या।
म्या तयांते धिक्कारून। मग पुढारा केले गमन।
तव दृष्टी देखिला ब्राम्हण। बहुस्त्रिया समवेत।
या स्त्रिया गुरूंचे स्तवन सुस्वर स्वरांत करीत होत्या. हे सर्व पहात मी गंगेच्या काठी येऊन बसलो. त्यावेळी सहश्र चंद्राचे किरण असावेत असा तेजात माझेंही स्वरूप तेजमय होऊन गेले. रात्रभर अशाच स्थितीत होतो. प्रातःकाली गुरू उठून आले. त्यांनी मजकडे पाहून मला पूर्ववत केले.
असे अनेक अनुभव घेत ऋध्दि-सिध्दींचे वाटेस न जातां गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले आता इतर ठिकाणी ऋध्दि सिध्दींचे वाटेस न जाता गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले. आता इतर ठिकाणी लक्ष देऊ नको. आत्मचिंतन कर असे सांगून त्यांनी माझे नांव निरंज ठेविले. मी गुरूदक्षिणा काय देऊ, माझ्या देहाशिवाय मजकडे कांही नाही आणि देहपण नाशिवंत आहे. गुरू म्हणाले मला सर्व काही मिळाले. 'स्वरूपी अखंड दृष्टी ठेव' हीच गुरूदक्षिणा. गुरूंनी कृपा करून गिरनारकडे जाण्यास आज्ञा दिली.
तेथून दुर्घट वजामधून सतत नामस्मरण व ध्यान करीत त्र्यंबकेश्र्वरी आलो. तेथून कोकण प्रदेश व भयानक वन लागले. सर्व प्रदेश निर्मनुष्य होता. झाडाखाली पडले की फळे व पाणी असे सेवन करीत होतो. एक दिवस अतिश्रमाने एका नदीकाठीच झोपलो. गिरनारची वाट कळेनाशी झाली. म्हणून आर्तस्वराने दत्तात्रयांची नावे घेऊन हाका मारीत सुटलो. तेंव्हा आकस्मत एक भिल्ल आला. त्याने नीट वाट दाखवून दिली आणि तो नाहीसा झाला.
पुढे तीन बैरागी भेटले. ते व्दारकेस चालले आहेत असे कळले म्हणून त्याचे बरोबर पुढे निघालो. पुढे एका गांवात तो तिथे भिक्षेसाठी गेले आणि त्यांनी गुरूसाठी भिक्षा पाहिजे म्हणून खूपच साहित्य गोळा करावयास सुरूवात केली. हा त्यांचा लोभी स्वभाव व वागणे पाहून माझे मन त्रासून गेले. मी त्यांना सोडून दुसरा रस्ता धरला. तेथून धर्मपूर या गांवी आलो. तेथे एक ............ ब्रम्हज्ञानी बोवांची गाठ पडली. मी त्यांना ज्ञानाबद्दल विचारले पण प्रचितीचे काहीच दिसले नाही. तेथील भाविक मंडळींन मला बरेच दिवस ठेऊन घेतले. नेहमीसाठी येथेच रहा म्हणू लागले. उत्तम भोजनाची सोय होती. तेव्हा विचार केला आता येथे राहण्यात अर्थ नाही. एके रात्री त्यांना न सांगता सुरूत या गांवाकडे गेलो. तेथे एक तपस्वीं गाठ पडले. त्यांनी विचारपूस केली. त्यांनी ज्ञान म्हणून मला जे सांगितले ते एकून मला हसू आले. त्याचे गुरूमार्गाप्रमाणे
।।म्हणे ब्रम्ह आहे उंच बहुत। मस्तक आकाशापरि येतं।।
।हात पाय स्थूळ बहुत। उदर मोठे विशाल पैं।।13।।
।म्हणे ले ब्रम्ह सर्वोत्कृष्ट। नाहीं याविण दुजे श्रेष्ठ।।
।ऐसे मज गुरूनें स्पष्ट। कथिलें आहे मजप्रति।।14।।
।त्यासी पहावयाचे लक्षण। पूर्व दिशेसी मुख करून।
।करावी छाया विलोकून। मुखावरी ध्यान धरोनि।।15।।
अशा प्रकारचे ध्यान व नाममार्गी पंथाचे बीजपंथ व क्रियापंथाची माहिती ऐकून फार त्रास झाला. या बाबांशी भाषणही करू नये असे वाटू लागले. म्हणून
।असो कोणी एक मुमुक्षानें। गुरू करावा विचारून।।
।मान्य जवाची वचने। वेदशास्त्रा मिळताती।।25।।
तेथून बडोदे येथे गेलो आणि एका राममंदिरात राहिलो. तेथें एक संन्यासी होते. त्यांचे दर्शन घेतले. त्यांचे बरोबर .......................... विवरण झाले. हे यतीश्वर म्हणजे ईश्वरच भेटले.
।।त्यांनी मजकडे पाहून। म्हणती तू दिससी परिपूर्ण।।
।ऐक सांगतो अंतर खूण। बहु बोलणें कासया।।34।।
।तुझे माझे मध्यभागी। त्यासि चैतन्य म्हणती योगी।
।व्यापुनिया सर्व जगीं। अभेद्याचे वर्ततसे।।35।।
।तयासीं कैसे पहावे। ऐसे म्हणशील स्वभावे।
।तरि तें सांगतो अनुभवें। श्रावणी घेई ऐकोनी।।36।।
।मनोवृत्तीने कल्पावे। पृथ्वीचे पलिकडे जावे।
।तेथें काय ते पहावे। ज्ञान दृष्टी करूनी।।37।।
।ऐसे पाहता पाहता मन। तेथेंचि जाय हारपोन।
।उरलें ते चैतन्य धन। ब्रम्ह परिपूर्ण त्या म्हणती।।38।।
।आपुल्या हृदयांत पहावे। चित्स्वरूपातें विलोकावे।
।सर्वंचि विश्वव्यापक व्हावे। आत्मस्वरूपें करोंनि।।39।।
।तेथे मनाचा तेगू नाहीं। ऐसे म्हणसी जरी काहीं।
।तरि मी सांगतो ते ही। श्रवण करा आदरे।।40।।
।जै मेणाची पुतळी करून। मृत्तिका लावी वरून।।
।रस ओतितां ऊनऊन। मेण तेथें न राहे।।41।।
।तैसे मनेकडोनि ..................। स्वरूपाचा पार न लागला।
।आपे आप मनोलयता। होऊनिया जातसे।।42।।
।ऐसे ऐकोनिया वचन। पोहोचली खूणे प्रति खूण।
।ब्रम्हानंदी समर सोन। स्तब्धपणें राहिलों।।43।।
।चार घटिकापर्यंत। दोघेही झालो समाधिस्त।
।स्वामी होऊनिया कृपावंत। आशीर्वाद पैं देती।।44।।
या स्वामींचे ठिकाणी तीन दिवस राहून काठेवाड देशांत गेलो. काट्याने भरलेला मार्ग भयंकर उन्हाळा, वाळूमय प्रदेश, दिगंबराचे नांव घेत त्याचे गुण वर्णीत मार्ग आक्रमण करीत असे. अन्नपाण्याची सोय नव्हती. मिळेल तेथें पाणी पिऊन वाट चालीत होतो आणि एक दिवस लांबून गिरनार पर्वताची शिखरे दिसली. त्यावेळी आनंद गगनांत मावेना.
।।गुरूने सांगितले ध्यान। आंतरिक्ष आहे मूर्ती सगुण।।
।तया प्रकारे मास तीन। ध्यान करता जाहलो।।
।तव आश्चर्य वर्तले एक। माझें अंतरी वाटले .............।
।दत्तात्रय मूर्ति सम्यक। मीच झालो ये काळीं।।
।तैसे झाले मज लागून। विसरूनि गेलो देहभान।
।चार घटिका स्तब्धपणे। मार्गी उभा राहिलो।।
अशा प्रकारे गिरनार पर्वताजवळ येऊन ठेपलों. या पर्वतात अनेक ठिकाणी तपस्वी आणि नाथपंथी रहात होते. एकदा एका गुहेच्या तोंडास दगड वगैरे लाऊन बंद केलेली दिसली ते दगड बाजूस करून त्या अंधाऱ्या विवरांत बरेच आंत गेलो. त्याठिकाणी एका योग्याचे दर्शन झाले. त्यांनी आशिर्वाद दिला. त्यांनी मला एक फळ खाण्यास दिले. त्याची चव अमृतासारखी होती. ते फळ खाऊन तृप्त झालो.
जन्म – कळंब, परळी वैजनाथजवळ, मराठवाडा
शके 1707, कार्तिक (शु/8 इ.स.1782)
पूर्वाश्रमीचे नाव - अवधूत
घरच्या गरीबीमुळे मूळ गावाहून तरूणपणी पुण्यास नष्टे नांवाच्या हुंडेकऱ्याकडे नोकरी – कारकून. सेवाधर्माचा कटू अनुभव आणि स्वार्थपरायण कुटुंबीयांमुळे वैराग्य उत्पन्न झाले. इ.स. 1811 चा हा काळ होता. पेशवाईची का....................... आली होती. (1818 पासून इंग्रजी राजवट)
पुण्यास बेलबागेमध्ये त्यावेळी ठाकूरदास नांवाचे प्रख्यात हरीदास करीत असत. त्यांचे कीर्तन ऐकून ............... वैराग्य उत्पन्न झाले आणि त्यांनी पुणे सोडले व भ्रमणास सुरूवात केली. आळंदी – देहू येथे इंद्रायणीचे पाणी हातांत घेऊन "आजपासून एक वर्ष सात दिवसांत सगुण साक्षात्कार झाला नाहीतर प्राणत्याग करीन." अशी तुकोबांची साक्ष ठेऊन घोर प्रतिक्षा केली. तेथून घोडेगांव, जुन्नर, कोतूळ अशी गावे घेत ते नगर जिल्ह्यातील अकोले येथे आले. तेथे कांही दिव राहून नाशकास गेले. तेथे त्यांची रघुनाथ नावाच्या सत्पुरूषाची गांठ पडली व त्यांना इ. स. 1811 गुरूंनी अपरोक्ष साक्षात्कार करून दिला. तेथे त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांना जरी निर्गुण आत्मसाक्षात्कार झाला तरी सगुण दर्शनाची प्रतिज्ञा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांवी गुरूंचा आज्ञा घेऊन गिरनार येथे दत्त भेटीसाठी जाण्याचे ठरविले. कोकण – गुजराथ – सुरत असा पायी प्रवास करीत ते गिरनार पर्वतापर्यंत आले. परंतु प्रतिज्ञापूर्ती दिवासास अवकाश असल्याने त्यांनी तीर्थयात्रा करून नंतर गिरनार प्रदक्षिणा सुरू केल्या. शेवटच्या तीन .................. दत्तात्रयांनी ब्राम्हण
रूपाने येऊन पहिले दिवशी स्वप्नात वस्त्रे दिली. सकाळी खरोखरीच त्यांना वस्त्रे मिळाली. तिसरे दिवशी खडावा प्रत्यक्षात मिळाल्या परंतु साक्षात दर्शन नाही म्हणून रात्रंदिवस त्यांनी आकांत मांडला. तीन दिवस झाल्यावर चवथे दिवशी श्री गुरूंचे नांव घेऊन एका शीळेवर डोके आपटून प्राण देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे केले असता डोके फुटून गेले. त्याबरोबर आपल्या तोंडात कोणीतरी कमडंलूतले पाणी घालीत आहे असा भास झाला ते सावधान होऊन पहातात तो प्रत्यक्षात श्री दत्तात्रय सगुणरूपाने उभे आहेत असे दिसले. श्रीं नी त्यांच्य डोक्यावरून हात फिरवला. मस्तकावर झालेली मोठी जखम आपोआप भरून गेली. श्री रघुनाथ गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाचे मनन करण्यास सांगून श्रींनी निरोप दिला.
या सगुण दर्शनाची चालती बोलती खूण म्हणून केशापासून भिवयापर्यंत एक वण अखेरपर्यंत मस्तकावर राहिला होता. गिरनारहून निरंजन स्वामी गुरू दर्शनास परत नाशकास आले. तेथे काली दिवस गुरू सेवा करून आपल्या कळंब या मूळ गांवी गेले. तेथे कांही वर्षे रालून गुरूबंधू श्रामंत वासुदेव पंडीत भाऊ महाराज यांचेकडे कोल्हापुरास सहकुटुंब राहिले. तेथून श्री गंगाधररांव पटवर्धन यांचे बोलावण्यावरून इ. स. 1845 सुमारास मिरजेस राहण्यास आले. मिरज सरकारांनी त्यांचेकडून अनुग्रह घेतला. पण मठ जमीन वगैरे कांही करून घेतले नाही. त्यांची विरक्त वृत्ती पाहून सरकारांनी त्यांचे चिरंजीव योगिराज यांना मठ व इनाम जमिनीची सनद करून दिली. 1866 साली सन्यांस ग्रहण केला व त्याच साली भाद्रपद शु/11 स त्यांनी मिरजेस कृष्णा प्रवहात जलसमाधी घेतली.
v निरंजन रघुनाथ यांचे ग्रंथ -
1) ज्ञानेश्वरांवर टीका
2) अमृतानुभव टीका
3) साक्षात्कार व आत्मप्रचिती हो दोन प्रकरणे आत्मबोध
4) शांकर भाष्यावर टीका
5) मांडुक्य उप. टीका.
v आत्मप्रचीतीमधील काही ओव्या –
ठाकूरदास -
अनेक प्रकारचें मतांतर। सांगूनि भेदितसें अंतर।।16।।
म्हणे तुम्हीच रे ईश्वर। नरदेही अवतरला।।
तुम्हीं तीन्ही अवस्था जाणतां। जाग्रति सुषाही व्दथा।।
या तिहींचा जो पहाता। तेचिं तुमचे स्वरूप।।17।।
ऐंसे ऐकून कीर्तन। माझें दचकले अंतःकरण।।
नेत्री पातले जीवन। कंठ दाटूनि तो आला।।26।।
पाठीं उभे राहिले ते काटे। शरीर कांपे थरथराटे।।
बोलूं जातो कंठ दाटे। शब्द ओठीं न निघती।।27।।
वांटे आतांचि येईल मरण। म्यां कांही न केले साधन।।
व्यर्थ गमाविले जिणे। विषयभदें करूनि।।28।।
तैसा मी भयभीत झालो। ठाकोरदासा जवळीं गेलो।।
हात जोडोनि विनंम्र झालो। स्तुती वदलों विशेष।।33।।
धन्यधन्य तुमचे कीर्तन। ऐकोनि झाले समाधान।।
आतां उव्दिग्न झाले मन। सर्व त्यागुनी जातसे।।34।।
साधू वदला प्रसन्न वदन। तूं होशील रे नारायण।
मला तोच शकुन मानून। तेथोनिया निघालो।।36।।
सकाळी पुण्याच्या बाहेर पडून चिंचवडाकडे निघालो मार्गांत एक जटामंडीत तपस्वी दिसला त्याला जवळचा तांब्या दान केला. चिंचवडास एक बैरागो दिसला त्यास उपरणें देऊन टाकले. देहूस तुकाराम – पांडुरंगाचे दर्शन घेतले.
अस्तू तया स्थळी जाऊन। उदासीन झाले मन।
वाटे मी नरतनूस येऊन। कांहीं सार्थक न केले।।47।।
ऐसा होऊन उदासीन। वस्त्रे वाटिली साधू लागून।
एक घोळ पांघरून। रात्रौ जागर पै केला।।48।।
क्षणक्षणा अश्रू येतीं नयनी। बहुसंताप उठे मनी।
वाटे म्यां जन्मास येऊनि। कांहींच केले नाहीं मी।।49।।
ऐसा आहोरात्र खेद करितां। भानू उदय झाला अवचिता।
मग स्नानासि घाटावरूता। इंद्रायणीच्या पातलों।।50।।
पूर्वदिशा आवलोकून। केले तुकारामाचे स्तवन।
समर्था। तूं धन्यधन्य। मजवर कृपा करा का।।51।।
एसे करितां स्तवन। तों दृष्टी पडली कौपीन।
दुसरे कटिसूता लागून। देखतां झालों ते ठाया।।52।।
तोचे प्रसाद वस्त्र घेऊन। तेथे कौपीन केली धारण।
सर्वांशी भस्म लाऊन। केले ध्यान दत्ताचें।।53।।
मग करं संपुटी जळ घेऊन। सोडले संकल्पा लागून।
जीवभाव मनःप्राण। गुरू अर्पण केलासे।।54।।
हृदयीं ठेवला नेत्र करून। आजपासून व्दादशमहिने।
दुपरी सात दिवस जाण। देह धारण करणें हा।।55।।
मजला दत्तात्रय दर्शन। झालिया ठेवीन हा प्राण।
नाहींतरी देह अर्पण। केला असें गुरूपायीं ।।56।।
ऐसा करूनि निश्चय अंतरी। साक्षी तुकोबा बाहेरी।
वाचे करूनि दीर्घस्वरें। तेथें वदतो जाहलों ।।57।।
...
अखंड वाचेसी नामस्मरण। दत्त अवधूत हेचिं भजन।
त्रैलोक्यी जयाचे गमन। जग उध्दारा अवतरले ।।61।।
करूनि त्यांचे नामस्मरण। पाऊल ठेवा भूमीलागून।
ऐसें अखंड लागले ध्यान। वेधलें मन निजरूपीं ।।62।।
अशा तऱ्हेनें हिडंत असतां मार्गातील लोक हासावयाचे – वेडारे वेडा म्हणायचे – पश्चातापाने दग्ध झाल्याने क्षुधेचे भानच राहिलें नाहीं. तहान लागल्यास पोटभर पाणी प्यायचे। अशा तऱ्हेंने तीन दिवस चाललों कोणतेच भान नव्हते. चौथे दिवशी सकाळी घोडेगांव लागले. तेथेंही वेडा आलारे असेंच लोक म्हणू लागले. या गांवात भिकोबा बाबा नांवाचा संत होता. त्याचेजवळ तीन दिवस राहिलों. गांवात भिक्षा मागितली. अंगावरील वस्त्र फाटून चिंध्या झाल्या होत्या. तेथून ब्राम्हणवाडा या गांवी गेलो. तेथें एका कानफाट्या बैराग्याजवळ राहिलो. त्यानें सांगितले कीं तुझा निश्चय पक्का असेल तर गिरनार पर्वतावर दत्तात्रय तुला दर्शन देतील. तेथें अनेक योगी अनुष्ठान करीत असतात. हे ऐकून गिरनार पर्वतावर जाण्याचे ठरविले. तेथून जुळारास गेलो. लोकांनी अनेक तऱ्हेने टवाळी केली. पण त्याच गांवी कुशाबा नांवाचा संत भेटला.
।।त्याचि गांवी कुशाबा संत। कौपीन धारी पिशाचवत् ।।
वेडियासारखा असे फिरत। शुध्द नाहीं देहाची।।93।।
मुद्रा लाऊनि खेचरी। अलक्ष पाहे दिगंतरी।
श्वासोश्वास वाहती अंतरी। सुषुश्रा मार्गि चालतू।।94।।
ऐसी तयाचि धारणा। दृष्टी देखिला योगिराज।
तथांसि केले साष्टांग नमना। हात जोडूनि विनविलें।।95।।
लोक त्याला वेडा समजत होते, पण त्यानें मला उपदेश केला. कंथा जतन कर म्हणून सांगितले. माझ्या वृत्तीस आनंद वाटला. त्यांची आज्ञा घेऊन मी पुढे निघालों. पुढें कोतुळ गांवी चंडीदास बाबा नांवाचे संत भटले. त्यांनी दिगंबर अवस्था का? म्हणून विचारें तेंव्हा कंथा अनंत ठिगळ्यांनी भरलि असल्याने नेसलो नाहीं असे सांगितले. त्यांनी भोजनास दिले व दत्तात्रय पुराणश्रावणास बसावयास सांगितलें. त्यांचे घरी तीन दिवस राहिलों. एक दिवस त्यांचे माडीवर मानसपूडा आरंभली.
।।आसनी बैसलो असता जाण। नाहीं भान देहाचे।
।हृदयांतरी करितों ध्यान। हें देही गेंलो विसरून।
।तेथिचा आनंद पाहून। वृत्ति शून्य पै झाली।।
त्या गांवी एका तरूण मुलींने मला पाहिलें. तिचा नवरा बऱ्याच वर्षापासून नाहींसा झाला होता. मीच तो असावा असे समजून तिने घरीं सांगितले. तिची आई व अनेक सोयरे जमा झाले. त्यांनी माझा वृत्तांत विचारला. मी माझे नांव गांव सांगितले आणि मीं तुमचा जावई नव्हे असे परोपरीने सांगितले आणि या कटकटतून वाचलो. मला माझ्या घराची व संसाराची आठवण झाली. लहानपणींच कष्ट करून कुटुंब पोसत होतो. पैसा संपला की घरची मंडळी पुन्ला देशांतराला जाऊन पैसे मिळवून आण म्हणत. असे कित्येक वर्षे चालले. एक वेळी स्त्री तरूण झाल्याचे समल्यावर घरी बरेचसे द्रव्य घेऊन गेलो. आनंद भोगला, सहा महिने झाले घरची मंडळी केंव्हा जाणार म्हणून विचारू लागली आणि एक दिवस द्रव्य मिळविण्यासाठी घर सोडावे लागले. पुण्यास कीर्तन प्रसंगी वैराग्य आले व सर्वसंग परित्याग करून ................... दत्त भजन करीत भटकू लागलो. ही सर्व कथा चंडीदासबाब व मुलीच्या लोकांना सांगितली. त्यांनी ती पटली. नंतर तेथून ................. गेलो. दिगंबरच होतो. त्या रात्री ब्राम्हण रूपानें दत्तात्रय आले व अंगावर वस्त्र वापरत जा म्हणून त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी एका ब्राम्हणानें दिलेले वस्त्र घेतले. तेथून नाशिकला आलो. तेथील देवतांची दर्शनें घेतली. पंचवटीस रामदर्शन घेतले. एके रात्री दत्तात्रयांनी स्वप्नांत रघुनाथ भटजीकडे जा म्हणून सांगितले. सकाळी एका संन्यासाला त्यांची माहिती विचारली. त्यांनी सायंकाळी भटजी भेटतात म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले माझे अंतःकरण शुध्द असेल तर आज सकाळींच मला त्यांचे दर्शन झाले पाहिजे असे म्हणून मी घाटावर चढलों तो कांही अंतरावर ब्राम्हण मंडळींचा समुदाय दिसला. त्यांत रघुनाथ गुरूंचे दर्शन झाले. आनंद झाला.
तंव गुरूराय तेथोनि गेला। जै दरिद्रिया परीस सांपडला।।
तेथील इतर ........ चे मार्फत रघुनाथ गुरूंचेकडे गेलो. त्यांनी विचारपूस केली. भोजनास थांबण्यास सांगितले. माझी सर्व हकीगत सांगून गिरनारास सगुण दत्तदर्शनासाठी जात आहे असे सांगितले. त्यांनी हसून येथेंही दत्त आहेतच असे सांगितले व त्यांच्या दत्तमंदिरातील मूर्ती दाखविली. ते पाहून अतिहर्ष झाला. मला चार दिवस राहण्यास त्यांनी सांगितले. त्या रात्रीं मला ब्राम्हण रूपाने देवान रात्री दर्शन दिले व सांगितले की येथे सोळा दिवस रहा. सकाळी सर्व कर्मे आटोपून माधुकरी मागून भक्षण केली. सायंकाळी गुरू मंदिरात गेलो. इतर मंडळी गेल्यावर त्यांनी कोणता सांप्रदाय? असे विचारले.
।।.................... तुझा ............ ध्यान। त्यांना निराकार कीं सगुण।।
............ धारणा धरूनि मनी। उदासीन पै केले।।
त्यांना नम्रतेनें सांगितलें.
।।ऐके वो सदगुरू समर्थ। माझी पश्चातापी कथा।।
।अग्निज्वाला नखादि शिखा। व्यापुनिया राहिल्या।
म्हणून भ्रमिष्टाकृती होऊन। फिरत आलों देशाटन।
परि स्थिर नव्हे अंतःकरण। उदासीन सर्वथा।।
।गुरूकृपा नाही संपादिली। धारणा अद्यापि नाहीं धरली।
संत मुखे किर्तन ऐकली। ते सगुण मूर्ती ध्यातसे।
गुरू रघुनाथ म्हणाले, उत्तम झाले आतां पश्चाताप सोड आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक.
।टोकोनिया शब्द विभाग। सांडोनि पोकळी दिशावलंब।।
।त्यागोवि आधार प्रकाश। चिदाकाश ते घेईल।।
आकाश सर्व व्यापक आहे। बाह्य दृष्टीसी न दिसताहे।
जेणि हृदयांतरी पाहे। ज्ञानदृष्टी करूनियां।।44।।
मग मी तैसाच पाहूं गेलो। पाहता तदाकारचि झालो।
देह स्फूर्तिने विसरलो। कोठे कांही ............................।।45।।
............ ध्याता कवण ध्यान। कोण वक्ता श्रोता करून।।
पाहतां हारपुनी गेले मन। तीव्र ध्यान लागले।।46।।
शरिरामनी आभास भरले। वाटे मस्तक भेदुनी गेले।
ब्रम्ह कराहामाजी मिनलें। स्वरूप माझे सर्वली।।47।।
अशा प्रकारे चार घटका ध्यानांत होतो. सर्व देहभान विसरलो – वाचेला शब्द फुटेना. नंतर सदगुरू म्हणाले ध्यान विसर्जन कर –
।तन अंतरी काढू गेलो ध्यान। वाटे कोठे ठेऊं काढून।
।याजला ठेवितों ठिकाण। याविण नाहीं दुसरा।।49।।
।अंतरी एकचि झाला गोळ। वाटे हृदयि आले भूगोल।
खाली वरी मध्ये निर्मळ। मीच अवघा व्यापलों।।50।।
माझी ही अवस्था पाहून श्रीगुरू म्हणाले –
।हेंचि ब्रम्ह निराकार। निरंजन निराधार।
।निःप्रपंच निरव्यापार। हेंचि स्वरूप तुझें पै।।52।।
।तुझें स्वरूप निराकार। हेंचि स्वरूप तुझे पै।।
।तुज जन्ममृत्यूचा घोर। एथून आतां नसेचि।।54।।
।आतां निर्भय होय अंतरी। सांडी व्देताची कर्तरी।
।नांदे एकपणाचे घरीं। स्वानंदेसी सर्वदा।।55।।
या प्रमाणें गुरू कृपा झाली,
।म्हणे शुकभृगपासून। म्यां संपादिले आत्माज्ञान।
।आकाशवत् चिंतन करून। हृदयांतरी पहावे ।।68।।
दुसरे दिवशी गुरूंना स्वप्न सांगितले. त्यांना आनंद झाला. त्यांनी बीजसहित दत्तात्रय मंत्र दिला. त्यांना नमन करून निघालो. या दिवसांत उन्माद दशा आली.
।नेत्र भ्रुकुटी एकच झाली। मस्तकाप्रती कळ लागली।।
।आकाशमय वृत्ती जाहाली। भान नाहीं देहाचे।।
।वाटो आकाशीच उडावे। किं समुद्रापलीकडे जावे।
।कीं ब्रम्हांडाचि गिळावे। तोंड पसरून आवघे।।86।।
।स्फुरण चढे नीराप्रती। बाहु उडली तटतटा।।
।जैसा मद्यपि दिसे भ्रांत। तैसी गती जहाली।।
।आपुलें न दिसेचि शरीर। आवघें दिसे निर्विकार।।
।सृष्टी जाहली धुम्राकार। नाहीं आकार कोठेही।।92।।
आणि माझ्याकडे कृपादृष्टीने पाहून मला देह भानावर आणलें. त्यावेळी माझें शरीर शीतल झाले. झोप आली आणि त्यांतच गाड समाधि लागली. तिला तूर्या म्हणतात. अशा प्रकारे गुरूप्रसाद झाला. दरिद्र्याला राज्य मिळाले, जीव जीवनमुक्त झाला. असे तीन दिवस झाले. मध्यान्ह रात्री –
करीत बसलो होतो ध्यान। तों एक वेश्याजवळ येऊन।
तिने आपुल्या स्तने करून। माझे दृष्टी ताडले।
आणखी एकाच हाशिने। आठ वेश्या गृह बांधून।
आपुल्या दारी बैसून। मज बोलावूं लागल्या।
म्या तयांते धिक्कारून। मग पुढारा केले गमन।
तव दृष्टी देखिला ब्राम्हण। बहुस्त्रिया समवेत।
या स्त्रिया गुरूंचे स्तवन सुस्वर स्वरांत करीत होत्या. हे सर्व पहात मी गंगेच्या काठी येऊन बसलो. त्यावेळी सहश्र चंद्राचे किरण असावेत असा तेजात माझेंही स्वरूप तेजमय होऊन गेले. रात्रभर अशाच स्थितीत होतो. प्रातःकाली गुरू उठून आले. त्यांनी मजकडे पाहून मला पूर्ववत केले.
असे अनेक अनुभव घेत ऋध्दि-सिध्दींचे वाटेस न जातां गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले आता इतर ठिकाणी ऋध्दि सिध्दींचे वाटेस न जाता गुरू सेवा चालविली. गुरूंनी सांगितले. आता इतर ठिकाणी लक्ष देऊ नको. आत्मचिंतन कर असे सांगून त्यांनी माझे नांव निरंज ठेविले. मी गुरूदक्षिणा काय देऊ, माझ्या देहाशिवाय मजकडे कांही नाही आणि देहपण नाशिवंत आहे. गुरू म्हणाले मला सर्व काही मिळाले. 'स्वरूपी अखंड दृष्टी ठेव' हीच गुरूदक्षिणा. गुरूंनी कृपा करून गिरनारकडे जाण्यास आज्ञा दिली.
तेथून दुर्घट वजामधून सतत नामस्मरण व ध्यान करीत त्र्यंबकेश्र्वरी आलो. तेथून कोकण प्रदेश व भयानक वन लागले. सर्व प्रदेश निर्मनुष्य होता. झाडाखाली पडले की फळे व पाणी असे सेवन करीत होतो. एक दिवस अतिश्रमाने एका नदीकाठीच झोपलो. गिरनारची वाट कळेनाशी झाली. म्हणून आर्तस्वराने दत्तात्रयांची नावे घेऊन हाका मारीत सुटलो. तेंव्हा आकस्मत एक भिल्ल आला. त्याने नीट वाट दाखवून दिली आणि तो नाहीसा झाला.
पुढे तीन बैरागी भेटले. ते व्दारकेस चालले आहेत असे कळले म्हणून त्याचे बरोबर पुढे निघालो. पुढे एका गांवात तो तिथे भिक्षेसाठी गेले आणि त्यांनी गुरूसाठी भिक्षा पाहिजे म्हणून खूपच साहित्य गोळा करावयास सुरूवात केली. हा त्यांचा लोभी स्वभाव व वागणे पाहून माझे मन त्रासून गेले. मी त्यांना सोडून दुसरा रस्ता धरला. तेथून धर्मपूर या गांवी आलो. तेथे एक ............ ब्रम्हज्ञानी बोवांची गाठ पडली. मी त्यांना ज्ञानाबद्दल विचारले पण प्रचितीचे काहीच दिसले नाही. तेथील भाविक मंडळींन मला बरेच दिवस ठेऊन घेतले. नेहमीसाठी येथेच रहा म्हणू लागले. उत्तम भोजनाची सोय होती. तेव्हा विचार केला आता येथे राहण्यात अर्थ नाही. एके रात्री त्यांना न सांगता सुरूत या गांवाकडे गेलो. तेथे एक तपस्वीं गाठ पडले. त्यांनी विचारपूस केली. त्यांनी ज्ञान म्हणून मला जे सांगितले ते एकून मला हसू आले. त्याचे गुरूमार्गाप्रमाणे
।।म्हणे ब्रम्ह आहे उंच बहुत। मस्तक आकाशापरि येतं।।
।हात पाय स्थूळ बहुत। उदर मोठे विशाल पैं।।13।।
।म्हणे ले ब्रम्ह सर्वोत्कृष्ट। नाहीं याविण दुजे श्रेष्ठ।।
।ऐसे मज गुरूनें स्पष्ट। कथिलें आहे मजप्रति।।14।।
।त्यासी पहावयाचे लक्षण। पूर्व दिशेसी मुख करून।
।करावी छाया विलोकून। मुखावरी ध्यान धरोनि।।15।।
अशा प्रकारचे ध्यान व नाममार्गी पंथाचे बीजपंथ व क्रियापंथाची माहिती ऐकून फार त्रास झाला. या बाबांशी भाषणही करू नये असे वाटू लागले. म्हणून
।असो कोणी एक मुमुक्षानें। गुरू करावा विचारून।।
।मान्य जवाची वचने। वेदशास्त्रा मिळताती।।25।।
तेथून बडोदे येथे गेलो आणि एका राममंदिरात राहिलो. तेथें एक संन्यासी होते. त्यांचे दर्शन घेतले. त्यांचे बरोबर .......................... विवरण झाले. हे यतीश्वर म्हणजे ईश्वरच भेटले.
।।त्यांनी मजकडे पाहून। म्हणती तू दिससी परिपूर्ण।।
।ऐक सांगतो अंतर खूण। बहु बोलणें कासया।।34।।
।तुझे माझे मध्यभागी। त्यासि चैतन्य म्हणती योगी।
।व्यापुनिया सर्व जगीं। अभेद्याचे वर्ततसे।।35।।
।तयासीं कैसे पहावे। ऐसे म्हणशील स्वभावे।
।तरि तें सांगतो अनुभवें। श्रावणी घेई ऐकोनी।।36।।
।मनोवृत्तीने कल्पावे। पृथ्वीचे पलिकडे जावे।
।तेथें काय ते पहावे। ज्ञान दृष्टी करूनी।।37।।
।ऐसे पाहता पाहता मन। तेथेंचि जाय हारपोन।
।उरलें ते चैतन्य धन। ब्रम्ह परिपूर्ण त्या म्हणती।।38।।
।आपुल्या हृदयांत पहावे। चित्स्वरूपातें विलोकावे।
।सर्वंचि विश्वव्यापक व्हावे। आत्मस्वरूपें करोंनि।।39।।
।तेथे मनाचा तेगू नाहीं। ऐसे म्हणसी जरी काहीं।
।तरि मी सांगतो ते ही। श्रवण करा आदरे।।40।।
।जै मेणाची पुतळी करून। मृत्तिका लावी वरून।।
।रस ओतितां ऊनऊन। मेण तेथें न राहे।।41।।
।तैसे मनेकडोनि ..................। स्वरूपाचा पार न लागला।
।आपे आप मनोलयता। होऊनिया जातसे।।42।।
।ऐसे ऐकोनिया वचन। पोहोचली खूणे प्रति खूण।
।ब्रम्हानंदी समर सोन। स्तब्धपणें राहिलों।।43।।
।चार घटिकापर्यंत। दोघेही झालो समाधिस्त।
।स्वामी होऊनिया कृपावंत। आशीर्वाद पैं देती।।44।।
या स्वामींचे ठिकाणी तीन दिवस राहून काठेवाड देशांत गेलो. काट्याने भरलेला मार्ग भयंकर उन्हाळा, वाळूमय प्रदेश, दिगंबराचे नांव घेत त्याचे गुण वर्णीत मार्ग आक्रमण करीत असे. अन्नपाण्याची सोय नव्हती. मिळेल तेथें पाणी पिऊन वाट चालीत होतो आणि एक दिवस लांबून गिरनार पर्वताची शिखरे दिसली. त्यावेळी आनंद गगनांत मावेना.
।।गुरूने सांगितले ध्यान। आंतरिक्ष आहे मूर्ती सगुण।।
।तया प्रकारे मास तीन। ध्यान करता जाहलो।।
।तव आश्चर्य वर्तले एक। माझें अंतरी वाटले .............।
।दत्तात्रय मूर्ति सम्यक। मीच झालो ये काळीं।।
।तैसे झाले मज लागून। विसरूनि गेलो देहभान।
।चार घटिका स्तब्धपणे। मार्गी उभा राहिलो।।
अशा प्रकारे गिरनार पर्वताजवळ येऊन ठेपलों. या पर्वतात अनेक ठिकाणी तपस्वी आणि नाथपंथी रहात होते. एकदा एका गुहेच्या तोंडास दगड वगैरे लाऊन बंद केलेली दिसली ते दगड बाजूस करून त्या अंधाऱ्या विवरांत बरेच आंत गेलो. त्याठिकाणी एका योग्याचे दर्शन झाले. त्यांनी आशिर्वाद दिला. त्यांनी मला एक फळ खाण्यास दिले. त्याची चव अमृतासारखी होती. ते फळ खाऊन तृप्त झालो.